Demo
trending_up TRENDING:

१८ तास उपाशी राहून वजन कमी? सोनाली बेंद्रेच्या ‘या’ डाएटवर डॉक्टरांनी का दिला धोक्याचा इशारा?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या १८ ते २० तासांच्या 'इंटरमिटेंट फास्टिंग' डाएटची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

person
१८ तास उपाशी राहून वजन कमी? सोनाली बेंद्रेच्या ‘या’ डाएटवर डॉक्टरांनी का दिला धोक्याचा इशारा?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी त्यांच्या आहाराबाबत माहिती दिली आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त राहण्यासाठी त्या ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ करतात. ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ अंतर्गत त्या १८ ते २० तासांचा उपवास करतात. दिवसातून त्या दीड वेळा जेवण करतात. सोनाली बेंद्रे यांनी नुकत्याच खुलासा केलेल्या त्यांच्या ‘डाएट’ने अनेकांचे लक्ष वेधले आहे. कमी खाणे, दीर्घकाळ उपवास करणे आणि निरोगी राहणे या संदेशाचा अनेकजण अवलंब करताना दिसून येतात.

उपवास काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. पण, ती काही कोणती जादू नाही. वजन कमी करण्यासाठी शरीरात कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे असते. हे कॅलरी नियंत्रण तुम्ही ‘इंटरमिटेंट फास्टिंग’प्रमाणे वेळा ठरवून करू शकता. नेहमीच्या संतुलित आहारात कॅलरीजचे प्रमाण कमी ठेवून वेळेचे बंधन न पाळताही करू शकता. खाण्याची वेळ महत्त्वाची असू शकते, पण वजन कमी होण्यामागे ‘कॅलरी डेफिसिट’ (शरीराला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा कमी कॅलरीज घेणे) हाच मुख्य घटक असतो.

‘इंटरमिटेंट फास्टिंग’ ही एक व्यापक संकल्पना का आहे?

यामध्ये १४:१०, १६:८ किंवा १८:६ अशा प्रकारच्या ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’चा म्हणजेच ठराविक वेळेतच खाण्याचा समावेश होतो. तसेच एकाआड एक दिवसाचा उपवास आणि अत्यंत लोकप्रिय असणारा ‘५:२ डाएट’ म्हणजे ५ दिवसांनंतर आठवड्यातील २ दिवस कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी करणे, यांचाही यात समावेश आहे. या पद्धतींच्या रचनेत फरक असला तरी त्यामागील मूळ तत्व एकच आहे. ते म्हणजे त्या खाण्याच्या संधी किंवा वेळा कमी करतात. त्यामुळे रात्री उशिरा खाणे, वारंवार गोड चहा पिणे, बिस्किटे, नमकीन, साखरयुक्त पेये आणि विनाकारण काहीतरी चघळत राहणे अनेक लोकांचे आपोआप बंद होते.

दिवसभरात किंवा आठवडाभरात व्यक्ती कमी कॅलरीज सेवन करते, त्यामुळे इंटरमिटेंट फास्टिंग प्रभावी ठरते. अनेक लोक जास्त वेळ उपवास केल्याने वेगाने चरबी (फॅट) कमी होईल या विश्वासाने अतिप्रमाणात उपवास करायला सुरुवात करतात. काही लोक सकाळचा नाश्ता टाळतात, दुपारचे जेवण लांबवतात, फक्त कॉफीवर दिवस काढतात आणि मग रात्रीच्या जेवणापर्यंत त्यांना तीव्र भूक लागते. याचा परिणाम म्हणजे जास्त प्रमाणात जेवणे, गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे, ॲसिडिटी, डोकेदुखी, चिडचिड, अपुरी झोप आणि शारीरिक हालचाली कमी होणे असा होतो. तुमचा उपवासाचा वेळ कागदावर किंवा दिसायला प्रभावी वाटू शकतो, पण जर एकूण कॅलरीजचे प्रमाण जास्तच राहत असेल, तर वजन कमी होण्यावर मर्यादाच येतील.

SELF
शेअर करा: share Facebook share Twitter share WhatsApp
person

लेखकाबद्दल

Dainik Loknisht

Dainik Loknisht हे दैनिक लोकनिष्ठचे वार्ताहर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध विषयांवर सखोल लेखन करतात.

संबंधित बातम्या

२४ तास सलग काम आणि पुरेशी झोप न घेतल्यास मेंदूवर होतो गंभीर परिणाम? तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
Lifestyle

२४ तास सलग काम आणि पुरेशी झोप न घेतल्यास मेंदूवर होतो गंभीर परिणाम? तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

अमिताभ बच्चन यांनी शूटिंगसाठी सलग २४ तास काम केले. सलग जागे राहिल्याने आरोग्यावर होणारे परिणाम आणि रिकव्हरी टिप्स जाणून घ्या.

comment प्रतिक्रिया (0)

प्रतिक्रिया द्या